कोरोनाच्या काळात अनाथ झालेल्या बालकांच्या उपाययोजना बाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या बैठकीला यश 

बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृती दल गठीत करण्याबाबत शासन निर्णय

मुंबई – कोविड साथ रोगाने बाधित बालके, तसेच साथ रोगात आई वडील गमावलेल्या बालकांचे संरक्षण व प्रतिपालन करण्याबाबत महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दि. ०६ मे, २०२१ रोजी महिला व बाल विकास विभागाचे व इतर संबंधित अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली होती. यासंदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय आज दिनांक ०७ मे २०२१ नुसार कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मा. मंत्री महिला व बाल विकास श्रीमती यशोमती ठाकूर यांचे अभिनंदन अभिनंदन ना.डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील दहा सदस्यीय समितीमधील प्रत्येक अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्यामुळे राज्यातील बालकांच्या जीवित व वित्ताचे संरक्षण व संवर्धन होणार आहे. चाइल्ड हेल्पलाईन 1098 प्रभावी वापर करून सर्व अनाथ झालेल्या बालकांचे संगोपन व सौरभ संरक्षण होणार आहे. राज्य शासनाच्या या उत्कृष्ट निर्णयाबद्दल ना.डॉ.गोऱ्हे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.
तसेच सर्व जिल्हाधिकारी या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करतील अशी आशा व्यक्त केली आहे.

 340 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.